स्क्रीन रीडर एक्सेस
English
मुख्य पृष्ठआमच्या विषयीयोजनाराजपत्रमंत्री महोदयांविषयीसचिवांविषयीवार्षिक अहवालपुरस्कारसंपर्क

आम आदमी विमा योजना Print E-mail

शासन निर्णय:
शासन निर्णय क्रमांक: आअवि-२०१०/प्र.क्र. ३५६/विसयो-२/दिनांक १६ ऑक्टोबर २०१०
शासन निर्णय क्रमांक: आअवि-२०१०/प्र.क्र. २२६/विसयो-२/दिनांक ८ जून २०११

उद्देश:
ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील कर्त्या व्यक्तीस विम्याचे संरक्षण देण्याकरीता आम आदमी विमा योजना दिनांक २ ऑक्टोबर २००७ पासून राबविण्यात येत आहे. भारतीय आयुर्विमा महामंडळाकडून लाभार्त्यांचा विमा उतरवण्यात येतो.

पात्रतेचे निकष, अटी व शर्ती:

  • ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील १८ ते ५९ वयोगटातील रोजगार करणारा कुटुंब प्रमुख किंवा कुटुंबातील एक मिळवती व्यक्ती.

भरपाईची रक्कम:

नैसर्गिक मृत्यू रु. ३०,०००/-
अपघाती मृत्यू रु. ७५,०००/-
अपघातामुळे कायमचे अपंगत्व आल्यास किंवा दोन्ही डोळे किंवा दोन्ही पाय निकामी झाल्यास रु. ७५,०००/-
अपघातामुळे एक डोळा किंवा एक पाय निकामी झाल्यास रु. ३७,५००/-

शैक्षणिक लाभ:
लाभार्थ्यांच्या ९ ते १२ वी इयत्तेत शिकणाऱ्या दोन मुलांना प्रती तिमाही प्रती मुलास रुपये ३००/- इतकी शिष्यवृत्ती मिळेल.

आवश्यक कागदपत्रे:

  • भूमिहीन असल्याचा पुरावा (५ एकर पेक्षा कमी जिरायती किंवा २.५ एकर पेक्षा कमी बागायती)
  • मुलांचा शाळेचा बोनाफाईड दाखला किंवा गुणपत्रिका (शिष्यवृत्ती साठी)

संपर्क:
अर्जदार राहत असलेल्या भागातील संबंधित तलाठी/ तहसीलदार/ बचतगट/ महा ई-सेवा केंद्र

Comments (0)Add Comment
Write comment
 
 
smaller | bigger
 

security image
Write the displayed characters


busy
 

मुख्य पृष्ठ | आमच्या विषयी | योजना | राजपत्र | मंत्री महोदयांविषयी | सचिवांविषयी | वार्षिक अहवाल | पारितोषिक | संपर्क

© २०१२ सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग.सर्व हक्क सुरक्षित.रचनाकार आरोग्य.कॉम